Saturday, July 21, 2007

फ़णस

मन आणि बुद्धी यांचे द्वन्द्व माणसाला घडवते, चांगल नाही तर वाईट, प्रेमळ नाही तर भावनाशुन्य, अव्यवहारी नाही तर अतिव्यवहारी अगदी पाषाण नाही तर लोणी, स्वत:च्या नजरेत आणि दुसऱ्यांच्या ही. ह्यांचे भांडण रोजच चालु असते, कधी छोटे कधी मोठे, कधी ते चटकन सहमत होतात तर कधी दिवस मागुन दिवस रात्री मागुन रात्री त्यांची झटपट चालु असते.

ह्या मनाच कारभारच जगाचा कारभार चालवतो. अगदी बाजारातुन एखादी गोष्ट विकत घेण्यापासुन ते राष्ट्रपति निवडण्यापर्यत. घरी बायको बरोबरचे डिल असो की ऑफ़िस मधले, निर्णय हे द्वन्द्वच घेते.

या रस्साखेचित जर तुम्हाल सुवर्णमध्य साधायचा असेल तर नुसते प्रेक्षक बनुन, निर्णय ऐकुन चालनार नाही, referee बनुन रिंगनात ऊतरावे लागेल आणि परिस्थिती नुसार मन किंवा बुद्धिला विजयी करावे लागेल.

हे दिसते तितके सोपे नाही, पण तुम्हाला जर फ़णस व्हायचे असेल तर या शिवाय दुसरा पर्याय नाही.

2 comments:

सर्किट said...

haa..haa.. Thube saheb, masta suruwat keli ahe blogging la. keep writing.. Really enjoyed your Fanas post! :-)

himan8pd said...

Class re!! Tujha blog waachayala suruwaat keliye nukatich! "FaNas" vachalya vachalya comment taakavishi vaatali - quality chhan aahe - quantity doesnt matter! :-)